शेतकऱ्यांनी जगायचे कसे? 

शेतकऱ्यांनी जगायचे कसे? 

औरंगाबाद - शेतीमालाला हमीभाव नाही. कर्जमाफीत केवळ आकड्यांचे खेळ सुरू आहेत. कर्जासाठी शेती गहाण, पीककर्ज मिळत नाही. यामुळे पाच वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यात यंदा दुष्काळाचा कहर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा सवाल किसान क्रांती दुष्काळ परिषदेचे संयोजक विनायकराव पाटील यांनी केला. 

सुभेदारी विश्रामगृहात सोमवारी (ता. 29) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीची निवेदने देऊनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शुक्रवारपर्यंत (ता. दोन) मागण्या मान्य न झाल्यास शनिवारी क्रांती चौक येथे जलसमाधी घेऊन देहत्याग करू, असा इशारा विनायकराव पाटील यांनी दिला आहे. 

तूर आणि हरभऱ्याचे अडीचशे कोटी रुपये सरकारकडे थकीत आहेत. नाबार्डने पीककर्जासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. प्रत्यक्षात मात्र 16 हजार रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यासारखे अनेक मुद्दे उपस्थित करून त्यांनी सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचे स्पष्ट केले. उमरगा तालुक्‍यातील कवठा गाव गहाण ठेवून शेतकऱ्यांना मदत देण्याचा उपहासात्मक इशारा देण्यात आला होता. मात्र, आता आम्ही त्यानुसार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त 500 शेतकऱ्यांना न्नाची पाकिटे, जनावरांना चारा यासारख्या जीवनावश्‍यक वस्तूंचे पॅकेज मदत म्हणून भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या आहेत मागण्या 
हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत 
दुधाला 40 रुपये लिटरचा भाव 
स्वामिनाथन आयोगाप्रमाणे हमीभाव 
60 वर्षे वयावरील शेतकऱ्यांना रु. 10 हजार पेन्शन 
व्यापारी, उद्योजकांप्रमाणे शेतकऱ्यांनाही कर्ज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com