औरंगाबादमध्ये कचरा पुन्हा पेटणार 

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र कंपनीतर्फे कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असून, मंगळवारी (ता. 28) प्रभाग दोन मध्ये कामगारांनी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. सोमवारी (ता. 27) प्रभाग तीनमध्ये आंदोलन करण्यात आले होते.

कचराकोंडीनंतर महापालिकेने चार ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे व शहरात घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन व वाहतूक करण्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीने काम सुरू केले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून टप्प्या-टप्प्याने काम सुरू करण्यात आले असले तरी चारच महिन्यात कंपनीच्या विरोधात आंदोलनाचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात कामगारांनी कंपनीकडून तुच्छ वागणूक मिळत असल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. त्यानंतर वेतन वेळेवर मिळत नसल्याने आंदोलन झाले. दरम्यान सोमवारी प्रभाग तीनमध्ये कामगारांनी काम करण्यास नकार दिला. कंपनीतर्फे या कामगारांची समजूत काढण्यात आली.

असे असतानाच मंगळवारी सकाळपासून प्रभाग दोनमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले. एप्रिल महिन्याचे वेतन देण्यात यावे, अशी मागणी करत कामगारांनी एकही वाहन कचरा संकलनासाठी नेले नाही. माहिती मिळताच घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी कंपनी व कामगारांची भेट घेऊन तोडगा काढण्याच्या सूचना केल्या. मात्र तोडगा निघू शकला नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com