औरंगाबाद : उष्णतेच्या झळाचे चटके बसत असतानाच पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. सध्या मराठवाड्यात पाच लाख ८० हजार १८० लोकांची तहान टॅंकरने भागवली जात आहे. पाणी पुरविणाऱ्या ३२१ टॅंकरपैकी २७६ टॅंकर हे खासगी असून केवळ ४५ टॅंकरच शासकीय आहेत, हे विशेष.
सध्या उन्हाचे चटके बसत असतानाच पिण्यासाठी पाणी मिळेना झाले आहे. टॅंकरची वाट पाहावी लागते. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहे. सकाळी लवकर शेतावर गेले तरच काम होते. उशीर झाल्यास उन्हाचा पारा चढलेला असल्याने काम करता येत नाही. मात्र, पाणी भरून ठेवल्याशिवाय शेतात कसे जाणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. टॅंकर सकाळीच येते असे होत नाही. त्यामुळे अडचण होत आहे. पिण्यास पाणी वेळेवर मिळत नसल्याने शेतात जाण्यास वेळ होतो. परिणामी कमे खोळंबतात. अशी सद्यस्थिती आहे. मराठवाड्यात हिंगोली वगळता सर्व सात जिल्ह्यांत टॅंकर सुरू करावे लागले आहेत. सर्वाधिक १३० टॅंकर हे औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. त्यापाठोपाठ बीडमध्ये १२१, जालना ४०, उस्मानाबाद १६, लातूर २, परभणी १ असे टॅंकर सुरू आहेत.
टॅंकरची वाट पाहणारे जिल्हे आणि त्यावर अवलंबून लोकसंख्या
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.