राजकारणातील भटक्यांमुळे निष्ठावंतांवर अन्याय 

file photo
file photo
Updated on

नांदेड - राजकारणात या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात भटकंती करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे त्या त्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, असे मत माजी शिक्षणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांनी व्यक्त केले. 

नांदेडला महात्मा गांधी मिशन संचलीत एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे) यांच्या वतीने ता. नऊ ते ता. ११ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विविध देशातील ८० संशोधक सहभागी होणार असून त्याची माहिती देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी मनमोकळी चर्चा करताना हे मत व्यक्त केले.

पक्षांतराच्या घटना वाढीस
अलीकडच्या काळात राजकारणामध्ये पक्षांतर करणाऱ्यांची संख्या आणि पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये जणू पक्षांतराची मेगाभरती सुरू असल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले. सत्ताधारी पक्षांमध्ये अन्य राजकीय पक्षातून येणाऱ्या पुढारी, नेतेमंडळींची संख्या भरमसाठ वाढली आहे. राजकारणात या पक्षातून त्या पक्षात भटकंती करणाऱ्या स्वार्थी नेत्यांची संख्याही तितक्याच प्रमाणात वाढली आहे. अशा भटकंती करणाऱ्या नेत्यांमुळे सच्चे आणि निष्ठावान असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय होतो.

मेगा भरतीमुळे पक्ष, कार्यकर्ते अडचणीत
विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या पक्षाने अन्य पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची मेगाभरती केली. त्या मेगा भरतीतील कार्यकर्त्यांनामुळेच तो पक्ष अडचणीत आला आणि ज्यांनी आपापले पक्ष सोडून अन्य पक्षात जाण्याचा प्रयत्न केला तेही अडचणीत आले. खऱ्या अर्थाने राजकारणातल्या त्या त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी या बाबीचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

पक्षांतर करताना विचार करा...
राज्याच्या राजकारणात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या तशी न मोजता येणारी आहे. भाजपमधून कॉंग्रेसमध्ये, काँग्रेसमधून भाजप, राष्ट्रवादीतून भाजपात, भाजपातून शिवसेनेत, शिवसेनेतून राष्ट्रवादीत अशा विविध राजकीय पक्षातून प्रवास करणारे कार्यकर्ते हे केवळ स्वतःच्या हितासाठी स्वार्थासाठी अशी राजकीय भटकंती करत असतात. अशी राजकीय भटकंती स्वतःच्या राजकीय नेतृत्वाच्या विकासासाठी करत असतात. त्यामुळे पक्षालाही अडचण ठरते. अशावेळी पक्षांतर करताना किंवा पक्षांतर करून घेणाऱ्यांनी विचार करावा, असा अप्रत्यक्ष सल्लाही श्री. कदम यांनी दिला आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com