ऊस जळाला...आर्थिक नुकसान सहन न झाल्याने महिलेचा हृदयविकारामुळे मृत्यू

ऊस उत्पादक शेतकरी ऊस कारखाना गाळप करण्यास नेत नसल्याने मानसिक तणावात आहेत.
Sugarcane Grower Farmers News
Sugarcane Grower Farmers Newsesakal

कळंब (जि.उस्मानाबाद) : बटाईने जमीन करणाऱ्या शेतकऱ्याचा शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून आर्थिक नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील सौंदना (आंबा) येथे घडली आहे. आर्थिक नुकसान असाहाय्य झाल्याने ६५ वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.११) पहाटेच्या सुमारास घडली आहे. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी (Farmer) यांचा ऊस कारखाना गाळप करण्यास नेत नसल्याने मानसिक तणावात आहेत. तालुक्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. सभासद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला जात नसल्याने शेतकरी मानसिक,आर्थिक संकटात सापडले आहेत. (Woman Died Due To Attack In Kalamb Of Osmanabad)

Sugarcane Grower Farmers News
Aurangabad| अश्लील व्हिडिओ प्रकरणी 'किर्तनकार बाबा'सह महिलेवर गुन्हा दाखल

ऊस जाण्याच्या आशेने उसाचे पाणी तोडून दोन-तीन महिने होत असल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रावरील ऊसाचे चिपाड होत आहे. त्यातच ऊसाचे वजन घटत असल्याने शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. तालुक्यात जवळपास १० लाख मेट्रिक टन ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. ऊस (Sugarcane) गाळपासाठी शेतकरी कारखान्याचे उंबरठे झिजवित आहेत. त्यातच तालुक्यातील सौंदना आंबा येथील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे दत्ता माणिकराव पाचपिंडे यांचा तीन एकर ऊस जळाला आहे. शेतकरी पाचपिंडे यांनी त्यांचे चुलते भगवान पाचपिंडे यांचे शेत वाट्याने केले होते. त्या शेतातील तीन एकर ऊस शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे जळाला. सदरील ऊसाचा सर्व खर्च बटाईदाराकडे असल्याने दत्ता पाचपिंडे यांचे अतोनात नुकसान झाले. त्यातच चार दिवसांपासून कुठल्याही कारखान्याची तोड मिळत नसल्याने ऊस शेतातच उभा होता. (Sugarcane Problem In Osmanabad)

Sugarcane Grower Farmers News
रोहित तू बिनधास्त जा, नितीन गडकरींनी आबांच्या लेकाला दिला शब्द

यामुळे दत्ता पाचपिंडे यांच्या आई अंजनाबाई माणिकराव पाचपिंडे (वय ६५) या तणावात होत्या. त्यांना रविवारी पहाटे हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेले असता आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेले पिक उद्ध्वस्त झाले तर डोक्यावरील मायेचे छत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com