जातेगाव (जि.बीड) : अतिवृष्टीत खरीप पिक (Kharip Crop) पूर्णतः खरडून गेले आहे. वर्ष कसे जाणार याच्या चिंतेने ग्रासलेल्या तेवीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१३) सकाळी बंगाली पिंपळा येथे घडली. दिलीप भगवान भोसले (वय २३, रा.बंगाली पिंपळा, ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे (Farmer Suicide) नाव आहे. मंगळवारी अतिवृष्टीने (Rain) खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले. वर्ष कसे जाणार याची चिंता सतावत असलेल्या दिलीप भोसले या तरुणाने मंगळवारी (ता.१२) किटकनाशक औषध पिल्यामुळे बीड (Beed) जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
बुधवार (ता.१३) उपचार सुरु असतानाच दिलीप भोसले यांचा मृत्यू झाला. चकलांबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीप भोसले यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. चार एकर शेतजमिनीत रोजंदारी करणारे कुटुंब असल्याने दिलीप भोसले या तरुण शेतकऱ्याची गावात छोटीशी किराणा दुकान होती, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.