भैय्युजी महाराज व रांजणगावचा हल्ला...

police inspector ashok indalkar write bhaiyyuji maharaj attack at ranjangaon ganpati article
police inspector ashok indalkar write bhaiyyuji maharaj attack at ranjangaon ganpati article

संध्याकाळचा सहा सातचा सुमार असेल. सुर्य मावळतीकडे झुकत चालला. पुण्यावरून नगरकडे जाणाऱ्या रोडवर नेहमी प्रमाणे धरण फूटून पाण्याचा लोट वाहवा तशी वाहतूक सुरु झाली. मोटारसायकली,ट्रक, टेम्पो, एसटया, कार, डंपर, कंपण्यांच्या बसेस यांनी हायवेवर एकच गर्दी केली. पुण्याकडून नगरकडे व नगरकडून पुण्याकडे रस्त्यावर वाहणांच्या लांबच लांब रांगा तरंगू लागल्या..

पुण्यापासून अहमदनगर रोडवर  ५०-६० कि मी लांब  रांजणगाव गणपती हे अष्टविनायक गणेशा पैकी एक मंदीर आहे.. रस्त्याच्या दक्षिणेकडे हे मंदीर असून रस्स्याच्या उत्तरेकडे खूप मोठी औद्योगिक वसाहत आहे. नॅशनल, मल्टीनॅशनल अशा २०० ते २५० लहाण मोठ्या कंपण्या एमआयडीसी मधे आहेत. संध्याकाळी ६ची शिप्ट सुटल्यानंतर शेकडो कामगारांना घेऊन बसेस पुणे शहराकडे जायला रोडवर तुटून पडतात. रोड छोटे तर त्यावर संध्याकाळी ६ ते ८ या कालावधीत वाहणे तुफान. त्यामुळे ट्रॅफीक जॅमींग ठरलेल.

अशाच वेळेत एके दिवशी एक ग्रे कलरची इनोव्हा ट्रॅफीक तोडत पुण्याकड्न  नगर रोडने घाईघाईत चालली होती. रांजणगाव मंदीर पास करून ही कार पुढील चौकात आली. कारच्या पुढे वाळूचा ट्रक होता. तो डुलत, डुलत आपल्याच तालात चालला होता. त्यामुळे इनोव्हा चालकाचे मस्तक फिरले होते. मस्तक साध सुध नव्हत तर पगडी घातलेल होत म्हणजे सरदार होता तो.. "पानचोत, गड्डी चला रहा है या टांगा ? " अस म्हणत सरदार हॉर्न देत होता. आणि अचानक वाळूच्या ट्रकचालकान ब्रेक मारला तशी सरदारजीची गाडी ट्रकला धडकली. आणि सरदारजीच्या मागील गाडीने ही सरदारजीच्या गाडीला ठोकर दिली. झाले , भडकनार नाही तो सरदार कसला. त्याने गाडीतून उतरून वाळूच्या ट्रक ड्रायव्हरला खाली ओढून बुकलायला सुरुवात केली. तसा ड्रायव्हर ठोs ..ठोs .करुन बोंबलायला लागला. ते बघायला ही गर्दी जमली.. रस्त्यावरच्या मेडिकल दुकानाबाहेर ३ टगे थांबले होते. ते पळत आले आणि सरदारजीला थांबवायला लागले . तरी सरदारजी माघार घ्यायला तयार नाही तेव्हा त्या तिघांनी सरदारवरच हात टाकला. हे भांडण आवरायला सरदारजीच्या इनोव्हा गाडीत पाठीमागे बसलेला तेज: पुंज चेहऱ्याचा जीन्स टी शर्ट घातलेला तरुण बाहेर आला , त्याच्याही अंगावर हे टगे धावले व धक्काबुक्की करू लागले .आणखी जमाव जमला ते पाहून सरदारजी थबकला. " महाराजजी चलीये ,भागीये ये कोई फ्लॅन दिख रहा है I " अस म्हणून त्याने त्या टी शर्ट मधील व्यक्तीला घेऊन कार सुसाट वेगात पुढे दामटली. कार इंदोरकडे भरगांव वेगात निघाली.. कारण कारमधे टी शर्ट मधील तेञपुंज चेहऱ्याची व्यक्ती दुसरी तीसरी नसून साक्षात राष्ट्रसंत भैयुजी महाराज होते. जिन्स टी शर्ट मधे त्यांना कोणी ओळखने आणि ते सुध्दा अशा परिस्थीती मधे अशक्य कोटीतील गोष्ट होती.. त्यांची गाडी सुसाटपणे इंदोरकडे पळू लागली. घटणा घडल्यानंतर नगरच्या पुढे गेल्यावर त्यांनी मोबाईलवरून आपल्यावर हल्ला झाल्याची घटना प्रेसला, नेतेमंडळींना कळवली आणि लगेच टीव्ही चॅनेलवर ब्रेकिंग न्युज सुरू झाली. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी मी असल्याने वरिष्ठ अधिकारी, पत्रकार यांचे फोन यायला सुरु झाले.. घटणास्थळ १० मीनिटाचे अंतरावर असल्याने आम्ही तेथे लगेच पोहचलो.. पांगापांग होऊन वाहतूक सुरू झाली होती.. स्पॉटवरही फारसे काही मिळाले नाही मात्र आजूबाजूला cctv कॅमेरे पाहुण घेतले .. घटणा प्रत्यक्ष पाहणाऱ्या साक्षीदारांची नावे घेतली. खुणी हल्ला, कटकारस्थान,मारहाण, शिवीगाळ, वगैरेचा गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला. ती रात्र अक्षरशः जागून काढावी लागली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच इंदूरवरुन महाराजांचे मठामधील सुरक्षा अधिकारी रांजनगाव पोलिस स्टेशनला आले. त्यांनी अत्यंत बारकाईने झालेल्या हल्ल्याबाबत माहीती घ्यायला सुरुवात केली. सर्वसाधारण पोलिसांबद्दल प्रथमदर्शनी तरी कोणाचा विश्वास नसतो. त्यात बाहेरच्या राज्यामधील लोकांचा तर नसतोच नसतो. हे लक्षात ठेऊन मी कसलीही शंखा येणार नाही याची खबरदारी बाळगत त्यांना सर्व कारवाईची माहीती देत होतो.. मध्यप्रदेशामधील् असले तरी त्यापैकी काही जनांना चांगल मराठी येत होत कारण ते नागपूर अमरावातीचे होते. महाराजांच्यावर पाळत ठेऊन हा हल्ला झाला आहे. हा खूप मोठा कारस्थानाचा गेम आहे. पुण्यावरुन पाठलाग झाला आहे, रांगणगावात महाराजांवर हल्ला करुन त्यांना ठार मारायचा कट होता परंतू नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. साहेब ही केस लाईटली घेऊ नका. यातील पाळेमुळे हुडकून काढा, कठोर कारवाई करावी लागेल. हलगर्जीपणा झाला तर खूप मोठी कारवाई होईल, तुमचे वरिष्ठ अधिकारी, एसपी, डीवायएसपी सुध्दा सुटणार नाहीत यातून वगैरे वगैरे बोलून वातावरण एकदम गंभीर करुन टाकलं.. परिस्थीतीचं गांभिर्य लक्षात आल्यानंतर  मी एसपी, डीवायसपींना फोन करून सर्व गोष्टींची कल्पना दिली. त्यांना या गोष्टींची आधीच कल्पना होती. काहीही मदत लागली तर सांग आम्ही स्टाफ गाडया पाठवतो पण सखोल तपास झाला पाहीजे. असे त्यांनी बजावले. पोलिस महासंचालक या केसवर लक्ष ठेऊन आहेत, पंतप्रधान कार्यालयातूनही  सतत माहिती घेतली जात आहे. बघ प्रकरण तुझ्यावर शेकायला नको असाही गर्भित ईशारा दयायला ते विसरले नाहीत.. आता माझ काही खर नाही या प्रकरणात कमी पडलो तर आपल संस्पेन्शन किंवा बदली ठरलेली आहे , मनातून रांजणगांव गणपतीला साकडं घातलं, देवा तूच मार्ग दाखव.

या प्रकरणाचा छडा लावायचाच असा ठाम निर्धार करून मी कामाला लागलो.. भैयुजी महाराज तर इंदूरहून परत पोलिस स्टेशनला येऊ शकनार नव्हते. त्यांच्या माणसांना मी सांगितले की भैयुजी महाराजांसोबत मला बोलायचे आहे.केसच्या तपासाकरीता महत्वाची माहीती घ्यायची आहे. इंदूरवरुण आलेल्या त्या माणसाने त्वरीत महाराजांच्या पीए ला फोन लावला व सांगीतले की ठाणेदार साहेबांना केसच्या संदर्भाने महाराजांना काही माहिती विचारायची आहे. त्यावेळी त्यांच्या पीए ने कळवले की महाराज ध्यानाला बसले आहेत. दोन तासांनी कळवतो.

"साहेब, महाराज आपल्याशी बोलणार आहेत. " त्या इंदुरच्या माणसाने मला सांगीतले. मी लगेच त्यांचा मोबाईल घेतला, " हॅलो. "पलीकडून मृदु पण धिरगंभीर आवाज आला. " " महाराज नमस्कार, मी रांजनगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर बोलतो आहे " " नमस्कार इंदलकरजी मी भैयु महाराज इंदुरवरुन बोलतो आहे, तुम्ही मला ओळखता का ? "शुध्द मराठीत गुरुजी बोलत होते. " हो महाराञजी आपल्याला कोण ओळखत नाही.. आपल्याला आठवते का आपण चार पाच वर्षापुर्वी साधारण २००५ साली प्शिवराज्याभिषेक स्मृतीदिनी प्रमुख पाहुणे म्हणून रायगडला आला होता.. तेथे तुम्ही तलवारीची आतिशय लिलया कसरत करुन दाखवली.. " " हो हो एस एवढ कस आपणाला माहीती. " महाराजांनी विचारले,, तेव्हा मी लगेच सांगितले. की त्यावेळी कोल्हापूरच्या राजे संभाजी महाराजांबरोबर सुरुवातीला आम्ही मोजकेच लोक शिवराज्याभिषेक सोहळ्याला येत होतो.. तुम्ही प्रमुख पाहुणे होता व तुमच्या निवासाची भेटीची सारी व्यवस्था संभा महाराजांनी माझेवर  सोपवली होती.आमचे पुर्वज हिरोजी इंदलकर यांनीच खर तर त्या काळी छत्रपतींच्या आज्ञेने रायगड किल्ला बांधला हे ईतिहासात आहे. " यावर भैयुजी महाराज " हो , बरोबर आहे. मी जाणून आहे ते " असे म्हटले. "आपली निवासाची व्यवस्था मी महाडला माझा ऊद्योजक मित्र सुर्यकांत महाडीक याच्या अलीशान बंगल्यावर केली होती. दुसऱ्या दिवशी तेथून आम्ही आपल्याला रोप वे ने रायगडावर कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. " भैयुजी महाराजांना सर्व आठवले. त्यांना खूप आनंद झाला. ते बोलले की आता मी निवांत झालो, तुमच्या बद्दल मला तीळमात्र शंका राहणार नाही. कारण माझ्या विरुध्द खूप मोठी साजीश आहे , मी पंतप्रधानांशी बोललो आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहणजी भागवत माझ्या घरी येऊन गेले. तुम्ही या केसमधे मुळापर्यंत जावा काय मदत लागली, दबाव आला तर मला सांगायला बिलकूल फिकीर करु नका, कारण माझा पाठलाग पुण्यापासून सुरू होता असा माझा दाट संशय आहे. रांञनगावात. त्यांचे काही लोक आधिच थांबून होते. माझ्या कारचे पुढे त्यांच्या वाळूचा ट्रक होता. त्याने मुद्दाम ब्रेक दाबुन अपघात घडवला व त्यांचे २-३ लोक वेपन घेऊन तेथे दबा धरून बसले होते ते पळत आले. त्यांचे पैकी तोंडावर लालसर डाग असलेल्या तरुनाने माझे वर ही हल्ला केला. त्यांनी वेपन काढण्याच्या आत आम्ही सावध झालो व ताबडतोप आमच्या कारमधे बसून इंदूरकडे आलो म्हणून वाचलो . वगैरे वगैरे.

मी त्यांचे बोलने लक्ष पुर्वक ऐकले, ऐकता ऐकता माझ्या नोटपॅडवरील पानावर सगळ्या नोंदी घेत होतो.. अशा बारीक सारीक नोंदी घेण्याची माझी सवय आहे कारण त्यातूनच पुढचा सारा तपास अवलंबून असतो. त्यानंतर मी भैयु महाराजांचा मित्र व कारचालक सरदारजी यांस रांजनगावला बोलावून घेतले. ज्या ठिकाणी घटणा घडली तेथे स्पॉटवर अनेक वेळा जाऊन सिसीटीव्ही कॅमेरा आहेत का पाहीले .आणखी साभीदार ,दुकानदार यांचेकडे बारकाईने चौकशी केली. सुदैवाने माझा परिसरात सतत संपर्क असल्याने व अनेक छोटया मोठया कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या यामधील स्टाफ, अधिकारी व स्थानिक लोकांशी सुसंवाद असल्याने, अनेकांना निरपेक्ष मदत केल्याने व्यक्तीगत संपर्क असल्याने मला मदत मिळत गेली. दिल्ली, मुंबई मधून तपासाबाबत सतत माहीती घेतली जात होती. स्थानिक पत्रकार, मराठी, हिंदी, इंग्रजी दैनिकांचे पत्रकार, वार्ताहर, न्युञ चॅनेलवाले सतत माहीती विचारून त्रास देत होते.तपासाकरीता पुणे ग्रामिणच्या पोलिस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे, तर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे पथकाचे पोलिस मदतीसाठी पाठवून दिले होते .परंतु माझ्या कडील पोलिसांवर माझा विश्वास होता तसेच बाहेरचे पोलिस घेतले तर माझा स्टाफ नाऊमेद झाला असता. त्यामुळे माझ्या स्टाफला एकदम विश्वासात घेऊन स्पष्टपणे ,ही केस कशी चॅलेंजींग आहे, बाहेरच्या स्टाफची मदत न घेता आपण अत्यंत तन्मयतेने काम केलं तर केस ओपण करता येईल, हां, अगदीच काम हाताबाहेर असेल तर जरूर मदत घेऊ... त्यांना समजावल्यानंतर ते सर्वांना पटले, वेळ थोडा होता... दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या, एक म्हणजे रांजनगावात ज्यांनी हल्ला केला त्यांना पकडायचे होते आणि दुसर म्हणजे ज्या वाळूच्या ट्रक मुळे हे सगळ रामायण झाले आहे तो ट्रकवाला धरुन आणायचा होता. आम्ही यासाठी दोन पथक केली. पो,हवा चव्हाण व हवालदार तेलंग हे वाहतूक पोलिसचे काम करायचे,, त्यातील तेलंग हा अतीशय चपळ व बेरकी पोलिस होता,, आरोपी पकडण्यात चलाख होता.

तेलंग पोलिसाबरोबर स्टाफ देऊन ट्रकची माहीती घेऊन त्यांना अहमदनगरकडे रवाना केले. माझ्याकडील स्टाफ घेऊन मी जवळच असलेल्या रांजनगावात हल्लेखोरांचा शोध घेऊ लागलो. दरम्यान मला गुप्त माहीती मिळाली की ज्या तीन टग्यांनी हल्ला केला ते माऊली पाचुंदकरांकडे काम करणारे आहेत व त्यांना माऊलीने अज्ञात स्थळी लपवून ठेवले आहे... पाचुंदकर फॅमिली ही रांजनगावातील अतीशय मातब्बर अशी फॅमीली होती. चार पाच भाऊ होते .पैकी एक बाळासाहेब पाचुंदकर यांनी पोलिस अधिकारी म्हणून मुंबईला चेंबूर परिसरात कर्तुत्व  गाजवले आहे व निवृत्त होऊन रांजनगावात व्यवसाय करीत आहेत, अडीअडचणीच्या वेळी ते मला खुप चांगले मार्गदर्शन करायचे. त्यांचा एक भाऊ डॉक्टर त्याचे मोठे हॉस्पीटल , एक मोठा ऊद्योजक, तर माऊली दोन तीनशे बसेसचा मालक.
         माऊलीला मी पोलिस स्टेशनला बोलावून घेतले.. अतीशय बलदंड असलेला माऊली त्याची अलीशान जग्वार कार घेऊन पोलिस स्टेशनला आला.. नेहमीप्रमाणे कार दूरवर उभी करून बाऊन्सर गाडीतच  ठेऊन एकटाच पायी माझ्या केबीन मधे आला, नमस्कार करून समोरच्या खुर्चीवर बसला.

       " माऊलीशेठ काय घटणा झाली आहे ते तुम्हाला माहीती आहेच.. दिवसभर टीव्हीवर तेच चालू आहे.. मुख्यमंत्री काय पंतप्रधानांपर्यंत ही घटणा माहीत झाली आहे.. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे.लवकर आरोपी अटक झाले नाही तर तुमची आमची चटणी होईल हे काय मी सांगायला नको, "
         " साहेब, आम्ही काय केलंय?? तुम्हाला माहीतीच आहे, सुपारीच खांडाच व्यसन नाही मला, दरवर्षी वारी करनारा मी माणूस.. कधी किरकोळ शिवीगाळीची ही माझेविरुद्ध तक्रार नाही. धंदा व रांजनगाव मंदीर  याच्या पलीकडे काय असतं ते माहीत नाही.. " घाम पुसत तो अंदाज घेत बोलत होता.. " माऊली, तुमची काहीच चुकी नाही परंतु मारहाण करनारे ते तीघेही तुमचे कामगार आहेत. ज्या ठिकाणी लपून राहीलेत ते ठिकाणही कोठे आहे त्याची खबर आहे मला. माऊली अजुनही आपल्याकडे वेळ थोडा आहे. तपासामधे काहीच प्रगती झाली नाही ,केस वर गेली तर मात्र घोटाळा होईल.आरोपी लपवून ठेवले म्हणून तुम्हाला अटक होईल... " मी माऊलीला स्पष्ट सूचना दिल्याबरोबर तो घाम पुसु लागला.. तो लगेच कबूल झाला. त्याने सर्व प्रकार सांगितलला.

          "साहेब हे माझे कामगार आहेत, गुन्हेगार नाहीत. औषध आणण्याकरीता ते काल संध्याकाळी चौकात मेडीकल शॉप मधे गेले होते. त्यांनी पाहीले की एका मराठी ट्रक चालकाला पंजाबी सरदारजी ट्रकमधून ओढून मारतोय तेव्हा ते थांबवण्याकरीता ते मधे पडले. सरदारजी चांगला डांबरट होता. पोरांवरही तो चालून आला तेव्हा मात्र पोरं चीडली , त्यांनी सरदारजीला ठोकायला सुरुवात केली, चौकात प्रचंड गर्दी जमली, ट्रॅफीक जॅम झाले, तेवढ्यात सरदार च्या कारमधील उंच गोरा युवक सरदारला वाचवायला आला पण मारहाणीत ते जखमी झाले. पण मग घाबरून त्यांनी कार घेऊन पळ काढला,.. आणि दुर्देवाने तेच भैयु महाराज असावेत, जीन्स टी शर्ट मधे पोरांनी त्यांना ओळखले नाही.. खूप गंभीर प्रसंग आला आहे .. त्या सर्वांची अतीशय गरीबीची परिस्थीती आहे.. आपण चौकशी करा. त्यांचा दोष आढळला तर काय वाटेल ती कारवाई करा, पण सर अन्याय करू नका,, वाईट एवढेच वाटते की भैयु महाराजांसारख्या दैवी व्यक्तीला यात गैरसमजुतीने  त्रास झाला. आम्हीही त्यांचे भक्त आहोत."

       माऊली मोठा उद्योजक असला तरी धार्मिक व सरळ स्वभावाचा होता, त्याचे बोलने मला पटत होते मी त्याला म्हटले मी सखोल तपास करीन व कितीही दबाव आला तरी जे योग्य तेच करेन. माऊलीने निरोप घेतला, माझे बरेचसे काम झाले होते. मला तासभर वाट पाहावी लागली. माऊली सोबत ते ३ टगे खाली मान घालून माझ्या चेंबर मधे हजर झाले. त्यांची चांगली खरडपट्टी काढली आणि पोलिसांना बोलावून त्यांचा पाहूनचार घ्यायला सांगीतला. बराच वेळ तो चालू होता व आम्हाला स्पष्टपणे ऐकू येत होता....

               आमची एक टीम अहमदनगरकडे तपासाला गेली होती..ञवळ होत नगर आमचे येथून... त्यांनी वाळूच्या ट्रकचा कसून तपास केला. ट्रकच्या पाठीमागे साखळ्या लोंबकाळत होत्या, लाल रंगाचा ट्रक होता, शेवटी 59 असा काही तरी नंबर होता अस स्टेटमेंट सरदारजीने दिले होते.. पोलिसांना एका ठिकाणी पाठीमागे साखळ्या लोंबकाळत असलेला ट्रक लांबून दिसला. ट्रकचा रंग व शेवटचा नंबर जुळून येत होता. बारकाईने चौकशी केली तेव्हा ट्रक तोच असल्याचे समजले... ट्रकचा चालक व मालक दोघांनाही पोलिस संध्याकाळी ६ चे सुमारास घेऊन आले.. त्यांच्याकडे बारकाईने चौकशी सुरू केली त्यांचे जाबञबाब नोंदवले. त्या सर्व जनांचे फोटो काढून भैयु महाराजांना पाठवले त्यांनीही ते ओळखले वाळूचा ट्रक, रांजनगावची हल्ला करनारी  टपोरी पोरं, ट्रक ड्रायव्हर यांची सर्वांची ओळख पटली. आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला...झाला प्रकार हा एका निव्वळ अपघाताचा प्रकार होता त्यामधे कसलीही साजीश,षड़यंत्र, घातपाताचा प्रकार नव्हता हे दिसून आले... हा सर्व तपास करताना भैयु महाराजांची इंदूरवरून आलेली माणस सतत हजर ठेवण्याचं मी भान ठेवलं. कारण कसलीही शंखा नको जे काही होईल ते त्यांच्या समोर होऊ दे अशा सूचना मी स्टाफला दिल्या होत्या. कारण तपास चालू असताना प्रत्येक बारीकसारीक गोष्ट ते मोबाईलवरून इंदूरला कळवत होते. मी सुध्दा माझ्या सर्व वरिष्ठांना सतत तपासाची प्रगती कळवत होतो. तपास पुर्ण झाल्यानंतर डीवायसपी, एसपी यांनी पोलिस स्टेशनला येऊन सर्व आरोपींकडे, साक्षीदारांकडे अगदी बारकाईने चौकशी केली. घातपाताचा कसला प्रकार नव्हता ह्याची त्यांनी खात्री केली. पोलिस महासंचालकांना मराठीत व इंग्रजीमधे रिपोर्ट दिले गेले.. आणि .आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

शिवीगाळ , मारहाण अशी खूप गंभीर स्वरूपाचा गुन्हा नसल्याने आरोपींनाही चार _ पाच दिवसात जामीण मिळाला. मी माझ्या कामाच्या गडबडीत होतो.दुसऱ्याच दिवशी माऊली त्या तीनही आरोपींना घेऊन पोलिस ठाण्यात आला. मला काही समजेना, " काय हो माऊली? परत काय काढले, " माऊली मला हात जोडले, " पाय धरा रे साहेबांचे. '' असे म्हणताच ते तीघेजन पुढे येऊ लागले. मी त्यांना तेथेच थांबवले. माऊली म्हणाला "साहेब, एवढया मोठया माणसाला पोरांकडून चुकून मारहाण झाली आम्हाला वाटले आता सारे संपले, पण एवढा प्रचंड दबाव असूनही तुम्ही योग्य तीच कारवाई केली. नाहीतर ठरवलंच असत तर खोटं रेकॉर्ड तयार करून पोरांच आयुष्य बरबाद करुन टाकलं असतं. फाटकी तुटकी घरं, जमीन विकूनही कायद्याच्या कचाटयातन निसटली नसती. तुमचे उपकार फिटणार नाहीत. '' '' मी काय फार मोठ केल नाही .जे घडले तेच मांडले.'' मी बोललो. " माऊली बोलला, "आम्ही निघालो आहे इंदूरला, महाराजांचे आश्रमात. तिघांना घेऊन भैयुजी महाराजांच्या पायावर डोक ठेवतो आणि चुकून झाल्या प्रकाराबाबत माफी मागतो." त्यानंतर माऊली शेठ त्या तिघांना घेऊन इंदूरला महाराजांचे आश्रमात गेले. महाराजांनी मोठया मनाने त्यांना माफ केले. नित्यपाठ, देवपुजा, ध्यानधारणा यासाठी दोन दिवस आश्रमात ठेवले. दरम्यानच्या काळात दोन वेळा सुग्रास भोजन नाष्टा, चहा कमी पडून दिले नाही.. निघताना त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले व आश्रमासाठी देणगी देण्याची ईच्छा बोलून दाखवली. महाराजांनी त्यांना आशिर्वाद दिले,सन्मार्गाने वागण्याचा सल्ला दिला व आश्रमातील गायींसाठी,गोमातांसाठी केवळ दोन ट्रक चारा पाठवण्याचे काम सांगितले.एवढेच नव्हे तर त्यांनी दिलेली तक्रारही नंतर  रितसर मागे घेतली. अशा प्रकारे एका गंभीर प्रकरणाचा शेवट मात्र सुखांत झाला.

मध्य प्रदेश मधील शुजानपुर येथील एका जमीनदाराच्या घराण्यात सन १९६८ मधे जन्म. उच्च शिक्षीत, उच्चविद्याविभूषीत, सुसंस्कृत रूपसुंदर अशा या  रुबाबदार तरुणाची लाईफस्टोरीची अलौकीक होती. साताऱ्याच्या इंजीनीयरिंग कॉलेजमधे शिक्षण घेत असतानाच त्यांना अचानक सिद्धी प्राप्त झाली. ते अद्यात्माच्या क्षेत्रात गेले. सुर्योदय परिवाराची स्थापणा केली, इंदूरमधे मोठा आश्रम उभारला. त्यांचा भक्तपरिवार वाढत गेला. भविष्य, सल्ला, समाजकार्य यातून राष्ट्र उभारणी करीता अलौकीक कार्य केले. अनेक स्थानिक तसेच  राष्ट्रीय नेते, ऊद्योगपती वारंवार त्यांच्याकडे जात. स्थानिक, सामाजीक, राजकीय समस्या निर्माण झाल्यावर त्यातून अनेक वेळा त्यांनी सहभाग घेऊन त्या सोडवल्या त्यामुळे राष्ट्रसंत म्हणून त्याना उपाधी मिळाली, आश्रमाच्या माध्यमातून पूर , नैसर्गिक आपत्ती, दुष्काळामधे चारा छावण्या, गरीब, गरजू आदिवासी, पारधी समाज यासाठी प्रचंड कार्य केले.. पण म्हणतातना अलौकीक सौंदर्य , व्यक्तीमत्व जसवरदान असत तस काही वेळा एखाद्याला शाप ठरतं. भैयुजी महारांजाबाबत तेच झालं. त्यांची संपत्ती हडपण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं, हनी ट्रॅप रचण्यात आला. शेवटी डिप्रेशन मधे त्यांनी 12 जून 2018 मधे स्वतःचे रिहॉल्वरमधून गोळी मारून घेऊन आत्महत्या केली. सगळा देश ही बातमी ऐकून सुन्न झाला.. आपल्या मुलाखतींमधून त्यांनी जे सांगीतले होते त्याचा प्रत्ययही आला.. ते म्हणाले होते. निती व मुल्यं जेथे संपतात तेथे विकृती सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com