पूरग्रस्तांसाठी पालघरमधून 15 टन वस्तूंचे ट्रक रवाना

पालघर ः पूरग्रस्तांना मदत पाठवताना पदाधिकारी.
पालघर ः पूरग्रस्तांना मदत पाठवताना पदाधिकारी.

पालघर  ः सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्‍यक वस्तू पाठवण्याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा शाखेतर्फे 15 टन जीवनावश्‍यक वस्तूंच्या साहित्याचा ट्रक सांगली जिल्ह्यातील बाधितांसाठी रवाना करण्यात आला.

या साहित्यांचे 998 किट तयार करण्यात आले असून त्यामध्ये पीठ, साखर, तांदूळ, तूरडाळ, कडधान्य, तेल, बेसन, मीठ, दूधपावडर, मिरची पावडर, मेणबत्त्या, माचिस डब्या, चहा पावडर, पेस्ट आणि टुथ ब्रश, आंघोळीचा साबण, कपड्याचा साबण, टॉवेल, मोहरी आणि जिरा पुडी यांचा समावेश आहे.

याबरोबरच मेडिसीन किट आणि इतर साहित्यांचे पाच बॉक्‍स, 70 किलो तांदूळ, 10 किलो डाळ व इतर गृहोपयोगी सामान आणि कपडेदेखील पाठवण्यात आले आहेत. या वेळी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, तहसीलदार रेवणनाथ लबडे, उज्ज्वला भगत, पुरवठा शाखेचे ना. तहसीलदार संभाजी पावरा यांच्यासह शाखेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com