मुंबईत अपघातांत वर्षभरात  179 जणांनी गमावला जीव

File Photo
File Photo

मुंबई : मुंबईत गेल्या वर्षभरात झालेल्या तब्बल १३ हजार १५० विविध अपघातांमध्ये १७९ जणांचा मृत्यू; तर ७२२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यात आग लागणे, इमारतींचा भाग कोसळणे किंवा घरे आणि भिंती कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत आगी लागण्याचे प्रमाण वाढत असून पावसाळ्यात झाडे पडणे, घर, घरांच्या भिंती, इमारतींचे भाग कोसळणे, गॅसगळती होऊन सिलिंडरचे स्फोट; तसेच नाले, नदी, समुद्र-खाडी, विहीर, खदानी, पूल, मॅनहोलमध्ये पडून, रस्त्यावरील अपघात अशा विविध दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये गेल्या १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९पर्यंत एकूण १३ हजार १५० अपघाताच्या घटना घडल्या. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांच्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

अपघातांचे प्रकार                   एकूण घटना           मृत्यू
आग, शॉर्टसर्किट                        ५२५४                 ३८ 
इमारतींचे भाग कोसळणे             १००३                 ५७
झाडे, झाडांच्या फांद्या पडणे        ४९३७                  ८
समुद्र नाले, मॅनहोलमध्ये बुडणे      --                    ६२

179 people lost lives in various Mumbai accidents during a year

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com