मुंबई - उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने सोमवारी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीला विधी विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी रविवारी विशेष खंडपीठ स्थापन करण्याची मागणी देखील याचिकेत करण्यात आली आहे.
राज्य सरकारने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली तशी अधिसूचना १९ जानेवारी रोजी सरकारने प्रसिद्ध केली. या अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी करत शिवांगी अग्रवाल, सत्यजीत साळवे, वेदांत अग्रवाल, खुशी बांगिया यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
शासनाने सुट्टी जाहीर केल्याने शैक्षणिक संस्था बंद राहतील त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, बँकिंग संस्था बंद राहिल्यास आर्थिक व सरकारी, सार्वजनिक कार्यालये बंद राहिल्यास प्रशासकीय कामांचे नुकसान होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
देशभक्त व्यक्तिमत्व किंवा ऐतिहासिक व्यक्तीच्या स्मरणार्थ सुट्टी जाहीर केली जाऊ शकते परंतु समाजातील विशिष्ट वर्गाला किंवा धार्मिक समुदायाला संतुष्ट करण्यासाठी सुट्ट्या जाहीर करणे चुकीचे असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.