वसई-विरारलगतच्या 29 गावांचा कौल महापालिकेच्या बाजूनेच! हरकती, सूचना, निवेदनांबाबत माहिती जाहीर

वसई-विरारलगतच्या 29 गावांचा कौल महापालिकेच्या बाजूनेच! हरकती, सूचना, निवेदनांबाबत माहिती जाहीर

विरार  : वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याबाबत अनेक दिवसांपासून लढा सुरू होता. हा लढा न्यायालयातही गेलेला होता, परंतु अखेर गावांचा कौल हा महापालिकेच्या बाजूने लागल्याचे समोर आले असून गावे महापालिकेतच राहणार असल्याचे समोर आले आहे. 

वसई-विरार महापालिकेतून 29 गावे वगळण्याबाबत गावकऱ्यांचा लढा सुरू होता. याबाबत 8 ऑक्‍टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायालयाने वसई-विरार क्षेत्रातून गावे वगळण्यासाठी 29 गावांसंदर्भात क्षेत्रातील घटकांशी व्यापक सल्लामसलत करून यथोचित निर्णय घेण्याचे राज्य सरकारला आदेश दिले होते, परंतु कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष सुनावणी न घेता हरकती/ सूचना/ निवेदने मागवण्याचे निर्देश कोकण आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार गावे वगळण्याच्या बाजूने 233 अर्ज व महापालिकेतून गावे न वगळण्याच्या बाजूने 9185 व 20 तटस्थ आले होते. तसेच उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ग्रामपंचायती ठेवाव्यात की नगरपालिका स्थापन कराव्यात.

यासाठी मागवलेल्या हरकती/ सूचना/ निवेदने यामध्ये 2708 अर्ज प्राप्त झाले होते. त्यात गावे वगळण्याच्या बाजूने चार; तर महापालिका गावे न वगळण्याच्या बाजूने 2704 अर्ज प्राप्त झाल्याने गावांचा कौल हा महापालिकेच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. याबाबत उशिराने पालिकेने माहिती जाहीर केली.

29 villages near Vasai-Virar is on the side of Municipal Corporation

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com