mumbai pune railway secrvice collapse
sakal
मुंबई - मुंबई-पुणे घाट विभागातील रेल्वे वाहतूक पूर्ण क्षमतेने पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांना मुसळधार पावसाने पुन्हा मोठा धक्का दिला आहे. ठाकूरवाडी-मंकी हिलदरम्यान पुनर्बांधणीसाठी टाकण्यात आलेल्या भरावाचा सुमारे १५ मीटर लांबीचा भाग वाहून गेल्याने दुरुस्तीचे काम आणखी कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १० ते १७ जुलैदरम्यान २२ नियमित एक्स्प्रेस आणि ८ विशेष अशा एकूण ३० गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिकूल हवामानातही मिडल लाईनवरून वाहतूक सुरू असून, उर्वरित दोन मार्गिका पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.