रस्ते अपघातात तलासरीत वर्षात ४२ जणांचा बळी

नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी जागृती करताना पोलिस.
नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी जागृती करताना पोलिस.

तलासरी ः तलासरी तालुक्‍यात गेल्या वर्षभरात अपघाताचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. लहान-मोठे शेकडो रस्ते अपघात झाले असून यामध्ये ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे अपघात कमी करण्यासाठी पोलिसांनी सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. 

विना हेल्मेट, भरधाव, बेदरकार आणि मद्यपान करून गाडी चालवणे आदी कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तालुक्‍यातून जातो. हा महामार्ग मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात असून या महामार्गावर अपघातात आजवर हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे; तर अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

रस्ता क्रॉसिंग, दिशा दर्शक फलकांचा अभाव, नागमोडी वळणे, वाढलेली अवजड वाहतूक आणि बेदरकार वाहनचालक ही या अपघातांमगची मूळ कारणे आहेत. त्यामुळे तलासरी पोलिसांतर्फे राज्यमार्ग, महामार्गावरील तसेच तालुक्‍यातील पोलिस परिसरात जनजागृती आणि प्रबोधन करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. समाजमाध्यमांमधूनही जनजागृतीचे संदेश पाठवले जात आहेत, अशी माहिती तलासरी पोलिस निरीक्षक अजय वसावे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com