Wildlife Attacks : वन्यप्राणी हल्ल्यांत ४२० लोकांनी गमावले प्राण; पाच वर्षांत १८२ वाघ आणि ८२० बिबट्यांचाही मृत्यू

Maharashtra Wildlife : महाराष्ट्रात २०२० ते २०२५ या कालावधीत वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये ४२० लोकांचा मृत्यू झाला असून, १८२ वाघ व ८२० बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राणी व माणसातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे, आणि वन विभाग त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरला आहे.
Wildlife Attacks
Wildlife Attackssakal
Updated on

मुंबई : राज्यात २०२० पासून मार्च २०२५ या कालावधीत १८२ वाघांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ४२० लोकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातील २५८ लोकांचा मृत्यू, हा फक्त वाघांच्या हल्ल्यात झाला आहे, असे वन विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. वन्यप्राणी व माणसातील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला चालला असून, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याची टीका होऊ लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com