उल्हासनगरमध्ये पुन्हा अभय योजना 

उल्हासनगरमध्ये पुन्हा अभय योजना 

उल्हासनगर - शहरात तब्बल पाचव्यांदा बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी अभय योजनेचा ठराव मंजूर केला आहे. गोरगरिबांनी आधीच दागिने गहाण ठेवून प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरला आहे. वसुलीचे अवघे तीन महिने राहिले असताना अभय योजना लागू करणे म्हणजे करबुडव्यांना अभय असल्याचा आरोप करत शिवसेनेसह भाजपच्या काही नगरसेवकांनी योजनेला विरोध केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी मतदानाच्या जोरावर योजनेचा ठराव मंजूर करून घेतला. 

साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांनी अभय योजना लागू करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर केल्यानंतर शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, रमेश चव्हाण, सुनील सुर्वे, अरुण आशाण, वसुधा बोडारे, भाजपचे डॉ. प्रकाश नाथानी, मीना सोंडे, रिपाइं आठवले गटाचे भगवान भालेराव, पीआरपीचे प्रमोद टाले यांनी प्रस्तावाला विरोध केला. लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या करबुडव्यांना अभय देण्यासाठी ही योजना लागू करता काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर महापौर पंचम कलानी यांनी मतदान घेण्याच्या सूचना दिल्यानंतर शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका निभावली आणि बहुमताच्या जोरावर अभय योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला. 

करवसुलीचे 100 कोटींचे मिशन 
यापूर्वी मनसेचे सचिन कदम, बंडू देशमुख, संजय घुगे, प्रदीप गोडसे आदींनी करबुडव्यांकडून प्रथम वसुली करा आणि नंतरच गरिबांना लक्ष्य करा, अशी मागणी अच्युत हांगे यांच्याकडे केली होती. त्यावर करबुडव्यांना आश्रय दिला जाणार नाही, असे आश्वासन हांगे यांनी दिले होते. यंदा वसुलीचे 100 कोटींचे मिशन आयुक्‍तांनी समोर ठेवले आहे. त्यासाठी 4 पथकप्रमुख व 14 विशेष सहायक पथकप्रमुखांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com