
Border Naka closed
ESakal
मुंबई : कालबाह्य ठरलेले व वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणारे राज्य सीमा तपासणी नाके देशातील १८ राज्यांनी बंद केल्यानंतर राज्याच्या परिवहन विभागानेही राज्यातील सर्व २२ सीमा नाके बंद करण्याचा प्रस्ताव मे मध्ये मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. परिवहन विभागाने राज्यातील सर्व सीमा नाके बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदाणींच्या कंपनीने परिवहन विभागाकडे नुकसान भरपाई म्हणून सुमारे ७,५०० कोटींची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने २,३०४ कोटींचा नफा कमावला आहे.