
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील कत्तलखाने आणि मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केडीएमसी प्रशासनावर टीका केली आहे.