एका प्रकल्पामुळे अलिबागचं भाग्य उजळणार का? 

एका प्रकल्पामुळे अलिबागचं भाग्य उजळणार का? 
Updated on

अलिबाग : तालुक्‍याचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या प्रस्तावित सांबरकुंड धरणाला नव्याने मान्यता देण्यात आली आहे. 38 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाचा खर्च आता 11 कोटीवरून तब्बल 742 कोटी 88 लाख रुपयांपर्यंत गेला आहे. या धरणामुळे तालुक्‍यातील 33 गावांमधील 2 हजार 528 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जेएसडब्ल्यू उद्योग आणि अलिबाग शहरासाठीही मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. 

हे वाचा : मद्यपींना गुड न्यूज 
1982 मध्ये हा प्रकल्प पहिल्यांदा चर्चेत आला. त्यावेळी तो 11 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला असता. आता केवळ बांधकामासाठी 485 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्याच बरोबर पुनर्वसन, वाढीव मोबदल्याचा प्रश्‍न अधिक किचकट झाला आहे. यासाठी 275 हेक्‍टर जमीन आवश्‍यक असून भूसंपादनाची किंमत चालू बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रुपये होणार आहे.

प्रस्तावित धरण परिसरातील जांभुळवाडी, सांबरकुंडवाडी आणि खैरवाडी या गावांचे पुनर्वसन रामराज येथील राजेवाडी येथे करण्यात येणार आहे. यासाठी आवश्‍यक 28 हेक्‍टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे आहे. प्रकल्पबाधीत गावांमधील 208 कुटुंबामधील लोकसंख्या 25 वर्षापूर्वी 1027 होती, यामध्ये आता तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे 38 वर्षांपूर्वीच्या समस्यामध्ये आता वाढ झाली असून या सर्व समस्याना जलसंपदा विभागाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. 


दृष्टीक्षेप 
बुडीत क्षेत्र : 228.40 हेक्‍टर 
कालव्यासाठी क्षेत्र : 46.60 हेक्‍टर 
सिंचनाचे लाभक्षेत्र :2528 हेक्‍टर 
मोबदला वाटप : 33 कोटी रुपये 

 
सुधारणा झालेल्या प्रशासकीय मान्यता 
मुळ मान्यता : 11.71 कोटी (ता.28 जुलै 1982) 
दुसरी सुधारीत मान्यता : 29.71 कोटी (ता.16 मार्च 1995) 
तिसऱ्या दरपत्रकाला मिळालेली मान्यता : 50.40 कोटी (ता. 6 ऑक्‍टो. 2001) 
चौथे अद्यावत दरपत्रक : 335.92 कोटी (ता. 2012-13) 
पाचवी सुधारित मान्यता : 742 कोटी (ता. 6 मे 2020) 
 
 
37.12 कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च 
प्रस्तावित धरणाच्या 103.81 हेक्‍टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी 2013 मध्ये 4.12 कोटी महसूल यंत्रणेस देण्यात आले आहेत. तर मार्च 2016 मध्ये प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा 2013 नुसार भूसंपादनास तयारी दर्शविलेल्या शेतकऱ्यांना 33 कोटी रुपयांचे वाटप झालेले आहे. 

  

सांबरकुंड प्रकल्पाचे लाभक्षेत्र 2 हजार 528 हेक्‍टर आहे. त्यामुळे असल्याने या प्रकल्पाने अलिबाग तालुका सुजलाम-सुफलाम होणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच बारमाही शेती, बागायती, लघुउद्योग यांच्यासाठी या धरणातील पाण्याचा उपयोग होणार आहे. 
- पंडित (सुभाष) पाटील 
माजी आमदार अलिबाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com