सर्व राजकीय पक्षांनी धर्मनिरपेक्ष विचारशक्तीच्या पाठीमागे रहावे - प्रकाश आंबेडकर 

aambedkar
aambedkar

मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे ख्रिस्ती समाज क्रांतिपर्व मेळाव्यात भाषणादरम्यान सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, राजकारण वाईट नाही. राजकारणात जर ख्रिश्चन बांधवांसारखे नितीमान लोक सहभाग घेवू लागले आले. तर भारतीय राजकारण चांगले होईल. आता चर्चच्या धर्मगुरूंनी धार्मिक शिक्षणा बरोबरच राजकारणातील चांगले नेतृत्व घडविण्यात जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. ख्रिश्चन लोक राजकारणापासून दूर राहतात. परंतु, भारत देशाच्या विकासाकरिता चांगल्या  राजकारण्यांचीच गरज आहे. त्यामूळे हम भारतीय व ख्रिश्चन समाजाने बहुजन वंचित आघाडीला बिनशर्त पाठिंबा द्यावा. अशी अपेक्षा देशातील सर्व ख्रिस्तीधर्मियांकडे केली.

हम भारतीय पार्टी व अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने दादर येथे ख्रिश्चन समाजाचा क्रांतीपर्व मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर व हम भारतीय पार्टी व अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे संस्थापक आशिष शिंदे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना आर.एस.एस सारख्या संघटना ना संविधानाच्या चौकटीत आणायचे असेल तर सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी धर्मनिरपेक्ष विचारशक्तीच्या पाठीमागे रहावे असेही ते म्हणाले.

याच अनूशंगाने अल्फा ओमेगा ख्रिश्चन व हम भारतीय पार्टीने ख्रिश्चन बहुल भागामध्ये उमेदवार उभे करून अधिकाधिक ख्रिश्चन जे वंचित व शोषित आहे. सत्ते पासून पिडीत आहेत. अशानां एकत्र करून ख्रिश्चनांची राजकीय ताकद मतपेटी व्दारे दाखवण्याची तयारी हम भारतीय पार्टी केली आहे. गेली सत्तर वर्षापासून ज्या राजकीय पक्षानी ख्रिश्चन समाजाच्या गठ्ठा मतदानास गृहीत धरले होते. त्यांनी आता या समाजाच्या मतदानास गृहीत धरण्याची चूक करू नये. असा इशारा ही अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ व हम भारतीय पार्टीचे संस्थापक आशिष शिंदे यांनी प्रस्थापित सर्वच पक्षांना दिला.

यापुढे ख्रिश्चन लोकांनी राजकारणात हम भारतीय पार्टीच्या माध्यमातून राजकारण सक्रिय व्हावे व ख्रिश्चन समाज व बहुजनांच्या हितासाठी लढा देणाऱ्याच्या पाठीमागे उभे रहावे. तसेच सरकारने ख्रिश्चन समाजासाठी मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ त्वरित स्थापन करावे. असे प्रतिपादन हम भारतीय पार्टीचे मुंबई अध्यक्ष अँण्ड्रू फर्नांडीस यांनी केले. कार्यक्रमाचे सूञसंचालन अतूल घाटगे यांने केले तर आभार, प्रदर्शन राज एडके यांनी केले.

या मेळाव्यासाठी विवेक निर्मळ, रेव्ह.शमूवेल मस्के, प्रकाश बेंजामिन, विल्यम चंदनशिव, सुनिल कूमार, डँनिएल ताकवाले, आशिष फर्नांडीस, शितल कूमार डेव्हिड, आनंद म्हाळूंगेकर, रितेश गोर्डे, नितीन गायकवाड, जयंत रायबोर्डे, राजू दांडगे, महेंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com