

Amit Thackeray
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल करत सरकारवर निशाणा साधला. “वर्षानुवर्षे हे शहर घाण होत चालले आहे. रस्त्यावर एका ठिकाणी डांबराचा पॅच, दुसऱ्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक आणि तिसऱ्या ठिकाणी काँक्रीटचा पॅच दिसतो. हा कोणत्या प्रकारचा रस्ता आहे? असा रस्ता कसा बनवू शकतात?” असा संतप्त सवाल ठाकरे यांनी केला.