

APMC Market
ESakal
तुर्भे : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ आणि भाजी बाजारामध्ये नियमांचे उल्लंघन करून व्यापार करणाऱ्या २०० हून अधिक व्यापाऱ्यांचे पंचनामे प्राप्त झाले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शरद जरे यांनी दिली आहे. बाजार समितीच्या ४० वर्षांच्या इतिहासात अद्यापपर्यंत धडक कारवाई करण्याचे धाडस कोणी केले नव्हते. यामुळे बाजार समितीच्या पाचही बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे.