
मुंबई : आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क २० रुपयांवरून वाढवून ५० रुपये करण्यात येत असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत केली. नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.