26 July Mumbai Flood: २६ जुलैची बदलापूरकरांना पुन्हा भरली धडकी! नदीने गाठली पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

Badlapur Rain Update: बदलापूर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे उल्हास नदीने इशारा पातळी गाठली असल्याने नागरिकांमध्ये २६ जुलैच्या पुनरावृत्तीचे भीती निर्माण झाली आहे.
Ulhas River reaches warning level
Ulhas River reaches warning levelESakal
Updated on

बदलापूर : २६ जुलै म्हटलं की बदलापूरकरांना पुराची भीती सतावत असते. २६ जुलै च्या आदल्या दिवशीच म्हणजेच २५ जुलै रोजीच पावसाने शहरात दमदार हजेरी लावली असून दिवसभरात जवळपास १०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून बदलापूरच्या उल्हास नदीने पुराच्या पाण्याची इशारा पातळी गाठली आहे. सध्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी ही १६.५० इतकी असून, नदीची धोक्याची पातळी ही १७.५० इतकी आहे. त्यामुळे पाऊस जर असाच पडत राहिला तर, यंदा देखील २६ जुलै ला पूर परिस्थिती निर्माण होईल की काय? या भीतीने बदलापूरकरांना धडकी भरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com