

Bhandup BEST Bus Accident
ESakal
मुंबई : दोन महिन्यांपूर्वी भांडुप येथे वर्दळीच्या स्टेशन रोडवर बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. बेस्टच्या ‘वेट-लीज’वर चालणाऱ्या विद्युत एसी बसचा सोमवार (ता. २९ डिसेंबर) रोजी अपघात झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असून या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. तर ११ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांचा कडक तपास सुरु असताना या घटनेत एक धक्कादायक खुलासा झाला आहे.