Rahul Gandhi : 'भारत जोडो न्याय यात्रे'त राहुल गांधींचा 'गरीबी हटाव' चा नारा

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात आज सकाळी मोखाडा येथून करण्यात आली. त्यानंतर जव्हार, विक्रमगड व नंतर वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे राहुल गांधी यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
Rahul gandhi
Rahul gandhisakal

वाडा - हिदुस्थानात 50 टक्यांपेक्षा जास्त गरीबीचे प्रमाण असून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक वर्षाला गरीब कुटुंबातील महिलेच्या बॅंक खात्यात एक लाख रुपये देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा काँग्रेस काम करून गरीबी हटाव करण्यात येईल असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज वाडा येथे दिले.

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात आज सकाळी मोखाडा येथून करण्यात आली. त्यानंतर जव्हार, विक्रमगड व नंतर वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे राहुल गांधी यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आदिवासी हे येथील मुळ रहिवासी असून त्यांच्या जागा उद्योजकांनी ताब्यात घेतल्या आहेत आमचे सरकार आल्यास सहा महिन्यांतच आदिवासींच्या जागा त्यांना आम्ही परत करण्याची गॅरंटी त्यांनी यावेळी बोलताना दिली. याचबरोबर वनखात्याची जमिन तसेच जंगल व जमिनीवर आदिवासींचाच अधिकार असेल ही आम्ही गॅरंटी देतो असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी जनतेशी संवाद बोलताना दिला.

अग्निवीर वर बोलताना राहुल गांधी म्हणाले मोदी सरकारने जवानांना सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले आहे तर चीनच्या जवांनांना पाच वर्ष प्रशिक्षण दिले या दोघांमध्ये सहा महिन्यांचे कि पाच वर्षांचे प्रशिक्षण वाला टिकेल असा सवाल त्यांनी नागरिकांना विचारत युद्ध झाले तर मृतदेहांची खच लागेल अनॄ याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न उपस्थित करून सैनिकांसाठी हत्यार, रायफल, पिस्तुल गोलाबारूद आदी साहित्य देण्याची जबाबदारी मोदी सरकारने अदानीला दिली असल्याची खंत व्यक्त करून हे मी पहिल्यांदाच पहातो असल्यांचे राहुल गांधी यांनी यावेळी जनतेशी संवाद करताना सांगितले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, मोदी सरकारने उद्योजकांची 16 हजार कोंटीची कर्ज माफ केली मात्र शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्ज सरकारने माफ केली का असा प्रश्न नागरिकांना विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात यावेळी केला.

हिदुस्थानात दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी या समाजाची लोकसंख्या 88 टक्के असून या समाजातील कोणाच्या मिडीया मालकीचा आहे का? का कोणी या समाजातील पत्रकार राष्ट्रीय पातळीवर आहे का असल्यास एक तरी दाखवा मी त्यांना शोधत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सर्वसामान्य मिडीयामध्ये नाही तर आपली बात कशी जाईल असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.या देशाचे सरकार हे आमदार खासदार चालवत नसून आय ए एस अधिकारी चालवत आहेत आणि हे अधिकारीही 88 टक्के मधले नसल्याने ते दलित आदिवासी ओबीसींचे प्रश्न काय सोडवणार असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टिका केली.

यावेळी भिवंडी वाडा मनोर महामार्गावरील प्रत्येक नाक्यावर राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कुडूस नाक्यावर हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com