

Bharat Taxi
ESakal
नवी मुंबई : सहकार चळवळीतील 'भारत टॅक्सी' (सहकार टॅक्सी) सेवेमुळे प्रवाशांना माफक दरात टॅक्सी सेवा मिळणार आहे. पाऊस, सणासुदीच्या काळात अतिरिक्त (सर्ज) शुल्क न आकारता सुरक्षित आणि किफायतशीर सेवा मिळेल. त्यामुळे मुंबईत येणारा प्रत्येक नागरिक निर्धास्तपणे भारत टॅक्सी बुक करेल. हा उपक्रम सहकार क्षेत्रातील मोठी क्रांती ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. या उपक्रमामुळे तीन ते चार हजार भूमिपुत्रांना रोजगार मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.