

Navi Mumbai redevelopment Project
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फुटले असून, भाजप आणि शिवसेनेत 'पुनर्विकास' आणि 'शहरी नियोजन' यावरून छुपे युद्ध रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप सभागृह नेते सागर नाईक यांनी महापालिकेत मांडलेल्या वहन क्षमता (कॅरिंग कॅपॅसिटी) आणि 'पायाभूत सुविधांच्या वैज्ञानिक अभ्यासा'च्या ठरावामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आक्रमक पुनर्विकास अजेंड्याद्वारे रहिवाशांना मोठे क्षेत्रफळ आणि वेगाने पुनर्विकासाचे आश्वासन देऊन जनाधार वाढवण्याच्या प्रयत्नाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.