"मुख्यमंत्र्याच्या टास्क फोर्सवर भरोसा नाही, पालिकेने मार्गदर्शक धोरण ठरवावी..."

"मुख्यमंत्र्याच्या टास्क फोर्सवर भरोसा नाही, पालिकेने मार्गदर्शक धोरण ठरवावी..."

मुंबई, ता.12 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तयार केलेल्या टास्क फोर्सने तयार केलेल्या कार्यपध्दती ऐवजी पालिकेने स्वताची कार्यपध्दती तयार करावी. गरज असल्यास या टास्क फोर्सशी सल्लामसलत कारावी. अशी मागणी भाजपने केली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णावर उपचार करणे तसेच आजार नियंत्रणात आणण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी जेष्ट वैद्यकिय तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार केली आहे. मात्र, भाजपने या टास्क फोर्सच्या कामावरच आक्षेप घेतला आहे. डॉक्टरच्या टास्क फोर्सने आता पर्यंत केलेल्या शिफारशी प्रत्यक्ष परीस्थीतीशी सुसंत नाही. त्यामुळे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त, झोनची जबाबदारी असलेले सनदी अधिकारी आणि उपायुक्तांनी धोरणं ठरवावीत अशी भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे. शिंदे आणि शिरसाट यांनी अतिरीक्त आयुक्त संजिव जैयस्वाल यांची भेट घेऊन ही मागणी केली.

घाटकोपर पासून मुलूंडची जबाबादारी असलेल्याा अतिरीक्त आयुक्त अश्वीनी भिडे यांचीही या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भागातील नागरीकांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संशयीत रुग्णांची कोरोना चाचणी करण्याची शिफारस  फक्त सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टरांना करता येणार आहे. यावरही भाजपने आक्षेप घेतला. खासगी डॉक्टरांनाही हे अधिकार द्यावेत अशी मागणी अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांच्याकडे केली असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

लक्षणं नसलेल्या ज्या व्यक्तिची चाचणी झाली आहे. त्यांचे घरात अलगीकरण न करता केंद्रामध्ये अलगीकरण करावे अशी मागणीही केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com