महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अत्यंत क्लिष्ट होत चाललाय. अशात आता निवडून आलेले आमदार राज्यात परत निवडणुका लागणार का ? या शक्यतेने चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान 8 तारखेला महाराष्ट्रातील सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करेल अशी देखील शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, त्या आधी भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. मात्र, असं झाल्यास आणि शिवसेनेची ताठर भूमिका तशीच राहिल्यास हे सरकार किती दिवस तग धरणार हा गुलदस्त्यातील प्रश्न आहे.
दरम्यान शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या जोरावर सरकार स्थापन केलं तर, वैचारिक मतभेद जरी असलेत तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्दिष्टामुळे राज्यातील नवीन राजकीय गणित हे आपल्याला अ मिळू शकतं. हे सरकार जास्त दिवस चालू शकतं असंही राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येतंय. दरम्यान, महाराष्ट्रावर राजकीय अस्थिरतेचे ढग कायम राहतील.
विधानसभा निवडणूक निकाल लागून १३ दिवस उलटून गेले आहेत तरीही सत्तास्थापानेबाबत काहीच ठोस माहिती अजूनही समोर येत नाही. एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात. अशात महाराष्ट्रात पहिल्यांदा निवडून आलेले आणि कमी मताधिक्याने निवडून आलेले आमदार चांगलेच धास्तावले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीतल्या प्रमुख पक्षांमधील सध्याचा संवाद आणि विसंवाद पाहता भाजप आता अल्पमतातील सरकार स्थापन करेल या शक्यतेला बळ मिळतंय.
राज्यात अनेक असे आमदार आहेत ज्यांना पाच हजारांपेक्षा कमी मतांनी लोकांनी निवडून दिलाय. असे आमदार आता महाराष्ट्रात जर मध्यावधी निवडणुका लागल्यात तर आपलं काय होईल या विचारांनी धास्तावले आहेत. खालील आमदारांना मिळालं पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य..
Webtitle : BJP might form minority government in maharashtra
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.