

BMC
Esakal
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण)’ प्रकल्पाचा विस्तार आणि पुढील टप्पे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आगामी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात १,९५० कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना मोठी गती मिळणार आहे.