

BMC
ESakal
मुंबई : मुंबईतील पदपथ सर्वसमावेशक, सुरक्षित आणि अडथळामुक्त करण्यासाठी महापालिकेने 'पादचारी प्रथम' अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे स्थानके, शाळा, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरातील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी याबाबतच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.