भरती वेळी पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई पालिका सज्ज; महापौरांची ग्वाही

rain
rain

मुंबई : भरतीच्या वेळी पाऊस झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका आहे. ओहोटी सुरू होताच तात्काळ पाण्याचा निचरा केला जाईल, अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना दिली.

मुंबईत यंदा पावसाला लवकर सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत पाऊस जुलैमध्ये सुरू होत होता. या वर्षी जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यास पाणी साचणाऱ्या भागांमध्ये उपसा पंप बसवण्यात येणार आहेत. भरतीच्या वेळी पाऊस झाल्यास पाणी साचणारच; मात्र ओहोटी सुरू होताच पंपिंग स्टेशनद्वारे साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा केला जाईल. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे, अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

मशीनने नालेसफाई
पावसाळ्यापूर्वी करावयची नालेसफाईची कामे झाली आहेत. उर्वरित कामे मोठ्या मशीनच्या साहाय्याने सुरू असल्याची माहिती महापौरांनी दिली.

bmc is ready to drain the water if it collects during low tide in rainy season, testified the mayor

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com