

BMC
Esakal
मुंबई : मुंबईत डास नियंत्रणाचे काम आता मुंबई महापालिका स्वतः न करता खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून करणार आहे. तीन वर्षांसाठी हे काम आऊटसोर्स करण्यात येणार आहे. यासाठी १७ कोटी ४३ लाख रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत; मात्र या निर्णयामुळे डासांविरोधातील लढा ठेकेदारांच्या भरवशावर राहणार असून भविष्यात डेंगी, मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यास ठेकेदारांना जबाबदार धरले जाईल का, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत.