

Bombay HC Directs BMC to Keep Roads Garbage-Free, Cites Indore's Success
sakal
मुंबई : मुंबईतील सार्वजनिक रस्ते कचरामुक्त ठेवणे हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. सार्वजनिक रस्त्यांवरील कचरा त्वरित हटवण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभाग अधिकाऱ्याला आदेश द्यावेत, असे आदेश बुधवारी (ता. १५) उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्तांना दिले. इंदूरला मिळालेला 'सर्वात स्वच्छ शहरा'चा किताब मुंबईला का मिळू नये, असा प्रश्न उपस्थित करीत न्यायालयाने महापालिकेला टोलाही लगावला.