Mumbai High court
Esakal
मुंबई : घाटकोपर (पश्चिम) येथील जमीनदोस्त केलेल्या इमारतीमधील ५२ भाडेकरूंनी, पुनर्विकासासंदर्भातील याचिकेत नवीन विकसकाला पक्षकार म्हणून समाविष्ट करून घेण्याकरिता केलेला अर्ज उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला. हा अर्ज म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आणि पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला.