मुंबई : शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबतच्या शासननिर्णयाची (जीआर) सरकारी शाळांमध्येच योग्यरीत्या अंमलबजावणी न केल्यावरून उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १९) राज्य सरकारची कानउघडणी केली. तसेच बदलापूर घटनेच्या पुनरावृत्तीची वाट पाहत आहात का, अशी घटना पुन्हा घडल्यानंतर जागे होणार का, अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.