Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ८ तासांच्या प्रतिक्षेनंतर जीवनवाहिनी पुन्हा सुरु

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे मंगळवारी मध्य रेल्वेची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. मात्र आठ तासानंतर लोकल सेवा सुरु झाली असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Mumbai Local
Mumbai LocalESakal
Updated on

मुंबई : मुसळधार पावसामुळे मंगळवारी मध्य रेल्वेची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. सकाळी ११.३० वाजता कुर्ला-सायन दरम्यान जलद मार्गावरील रुळ पाण्याखाली गेल्याने सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली. हा खंड तब्बल आठ तासांपर्यंत कायम राहिला. संध्याकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी सीएसएमटीवरून कल्याणकडे लोकल सुटली आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com