मुंबई : अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार

मध्य रेल्वेच्या एप्रिल ते जूनपर्यंत मुंबई-बलियासाठी ७८ फेऱ्या
Central Railway Mumbai
Central Railway Mumbai

मुंबई : उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि बलिया, गोरखपूरदरम्यान १८२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये  मुंबई-बलिया त्रै-साप्ताहिक विशेष ७८ फेऱ्या होणार आहेत.  ०१०२५ विशेष गाडी १ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि बलिया येथे तिसऱ्या दिवशी  पोहोचणार आहे.

०१०२६ विशेष गाडी ३ एप्रिल ते १ जुलैपर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बलिया येथून दुपारी ३.१५ वाजता  सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे. मुंबई-गोरखपूर आठवड्यातून ४ वेळा विशेष १०४ फेऱ्या धावणार आहे. यामध्ये ०१०२७ विशेष गाडी आठवड्यातून ४ वेळा २ एप्रिल ते ३० जून पर्यंत दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे.  तर ०१०२८ विशेष गाडी आठवड्यातून ४ वेळा ४ एप्रिल ते २ जुलैपर्यंत दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गोरखपूर येथून २.२५ वाजता  सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पोहोचणार आहे.

या संपूर्ण विशेष गाड्यांमध्ये एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान  आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे राहणार आहे. या गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग २७ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com