railway
sakal
मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये मध्य रेल्वेने प्रवासी वाहतुकीत स्थिर वाढ नोंदवत ८.१६ लाख गाड्यांमधून तब्बल १६४.३० कोटी प्रवाशांची वाहतूक केली आहे. मागील वर्षीच्या १६१.३३ कोटी प्रवाशांच्या तुलनेत ही १.८४ टक्के वाढ असून, उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.