

Trains Run 30 To 40 Minutes Late After Ghatkopar Vikhroli Issue
Esakal
Central Railway Delays Cause Rush At Stations मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं काही लोकल थांबल्या आहेत. यामुळे हजारो प्रवासी मधेच अडकून पडले आहेत. ऑफिस, शाळा, कॉलेजच्या वेळेतच मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे.