Sharad Pawar
Sharad Pawar

फडणवीस यांच्या निष्काळजीपणाचा परिणाम म्हणजे नक्षलवादी हल्ला : शरद पवार

मुंबई : नक्षलवादी हल्ल्यात राज्याचे 15 जवान हुतात्मा होणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामागे सरकारची नक्षलग्रस्त भागातल्या विकासाबाबतची अनास्था कारणीभूत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मागून घेतले. त्यानंतर या नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी आमच्या सरकारने स्वतंत्रपणे विकास आराखडा तयार केला. त्यासाठी आर्थिक तरतूदही केली. स्वत: आर. आर. पाटील हे दर महिन्याला गडचिरोलीला जाऊन आढावा घेत असत. त्यामुळे तिथल्या जनतेला सरकारबाबत विश्‍वास वाढला होता, अशी आठवण पवार यांनी सांगितली. 

मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: गृहमंत्री आहेत. ते विदर्भातून येत असल्याने त्यांचे गडचिरोलीच्या विकासाकडे अधिक लक्ष राहील, असे मानले जात होते. पण, फडणवीस यांच्याकडे या नक्षलग्रस्त भागाच्या विकासाचा कोणताही आराखडाच नाही. त्यातून तिथल्या जनतेमध्ये नाराजी आहे. नक्षलग्रस्त भागातल्या जनतेत नाराजी असते तेव्हा नक्षलवादी त्याचा फायदा घेतात, असे स्पष्ट करीत सध्याचा झालेला हल्ला हा फडणवीस यांच्या निष्काळजी व अनास्थेचा परिणाम असल्याची टीका पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com