

CM Devendra Fadnavis
Esakal
मुंबई : दहा वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय मुंबईत आपले घर होईल असे स्वप्नही पाहत नव्हता; मात्र त्यांचे घराचे स्वप्न मुंबईतच पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कष्टकरी कामगारवर्ग मुंबईत टिकून राहावा, त्याला मुंबईतच घर मिळावे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाने नायगाव बीडीडी चाळीच्या जागेवर उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ सदनिकांच्या चाव्यांचे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पात्र रहिवाशांना वाटप करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.