मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळाची पत्रकार परिषद झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार टोलेबाजी केली. योग्य कालावधीत शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती योजना पूर्ण करण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांची यादी उद्या सरकार जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिशा सारखा कायदा महाराष्ट्रातही
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विरोधfपक्षाकडून तूर आणि तांदूळ खरेदी संदर्भात करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात महिला सुरक्षे संदर्भात राबवण्यात येणाऱ्या योजनेबद्दल माहिती दिली. आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू केला आहे. त्या कायद्याची माहिती घेण्यासाठी आंध्र प्रदेश दौरा केल्याचं ही गृहमंभी देशमुख यांनी सांगितलं. दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र्रातही महिला सुरक्षे संदर्भात कायदा करण्याचा विचार असल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपचा समाचार घेतला. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आहे. पण, राज्यात एकही दंगल झालेली नाही. ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. तिथं अशांतता आहे. उत्तर प्रदेशात दंगली घडत आहेत. दिल्लीत गृहखातं केंद्राकडं असताना तिथं 60 दिवसांपासून शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. तिथं ही अस्वस्थता आहे. असं असताना त्यांनी (भाजप) आपल्या राज्याकडं लक्ष द्यावं. केंद्राकडून जीएसटीचे पैसे मिळण्यात उशीर होतो आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यांना या संदर्भात कल्पना दिली आहे. महाराष्ट्राला जीएसटीचे पैसेही बुलेट ट्रेनसारखे मिळावेत.'
उद्धव ठाकरे म्हणाले...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.