अलिबाग : उधाणाबरोबर आलेल्या तेल तवंगाने रायगड जिल्ह्याचे समुद्रकिनारे पूर्णपणे काळवंडले आहेत. अलिबाग, मुरूड तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर याचे प्रमाण खूप आहे.
मुंबई बंदरात आखाती देशांतून येणारी तेलवाहू जहाजे शिल्लक राहिलेले तेल अरबी समुद्रात सोडून देतात. या तेलाचे तवंग रायगड जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर पसरते. या वर्षी याचे प्रमाण जास्त असल्याचे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. या तवंगाचा मासेमारीवर परिणाम होत आहे.
तवंग लागलेली जाळी सोडवता येत नसल्याने ती पुन्हा वापरता येत नाहीत. त्याचबरोबर समुद्रात पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांच्या अंगालाही तवंग लागत असल्याने पर्यटक समुद्रात उतरत नाहीत. या तवंगाने सासावने, वरसोली, अलिबाग, बराशिव, मुरूड हे किनारे काळवंडले आहेत. हे तवंग काढण्याची मागणी सागर कन्या मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.