

11th Admission
ESakal
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने नेमलेल्या कंत्राटदाराने दहावीची गुणपत्रिका वेळेत तयार न केल्याने अन् त्याकडे मंडळाने केलेल्या दुर्लक्षामुळे अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. २९) प्रचंड त्रास सहन करावा लागला. ऑनलाइन प्रवेश निश्चित होऊनही अनेक विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकेअभावी काही महाविद्यालयांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याने रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.