निवडणुकीचे काम करताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या परिवाराला मिळणार 15 लाख रुपये

निवडणुकीचे काम करताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या परिवाराला मिळणार 15 लाख रुपये

उल्हासनगर : निवडणुकीचे काम करतेवेळी उल्हासनगर पालिकेचे कर्मचारी भगवान मगरे यांचा मृत्यू झाला होता. निवडणुकीच्या परिपत्रकानुसार मगरे यांच्या परिवाराला 15 लाख रुपये मिळावेत, असा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांना पाठवण्यात आल्याची माहिती उपविभागीय तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिली.

म्हारळ गाव रिजेन्सी निर्माण येथील खुल्या मैदानातून ईव्हीएमचे रविवारी 28 तारखेला वाटप करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेत आरोग्य विभागात सफाई कामगार पदावर कार्यरत असलेले भगवान मगरे (54) यांची उल्हासनगर विधानसभेच्या मीनल अर्जुन चौहान विद्यालयातील बूथ क्रमांक 87 येथे नेमणूक करण्यात आली होती. भगवान मगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ईव्हीएम आणि साहित्य घेऊन दुपारी 12 वाजताच्या सुमारास मीनल अर्जुन चौहान विद्यालयातील बूथ गाठला.

बूथ प्रमुखांच्या आदेशाने मतदान केंद्रावर साहित्य लावून झाल्यावर भगवान मगरे यांनी जेवण केले. त्यानंतर खुर्चीवर बसलेले मगरे हे अचानक खाली कोसळले. त्यांना बूथप्रमुखांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले होते. त्यादिवशी 40 डिग्री तापमान होते. त्यात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

एखाद्या कर्मचाऱ्याचा निवडणुकीचे काम करताना मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला 15 लाख रुपये देण्याची तरतूद निवडणुकीच्या परिपत्रकामध्ये आहे. त्यानुषंगाने मगरे यांच्या परिवाराला 15 लाख रुपये मिळावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पाठवण्यात आल्याचे जगतसिंग गिरासे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com