मुंबई : कोरोनाशी सुरू असलेल्या युद्धात (Corona) लस हे सर्वात मोठे शस्त्र आहे, परंतु, मुंबईत आतापर्यंत एक आणि दोन्ही डोस घेतल्यानंतर (corona vaccination) सुमारे 23,000 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेच्या निरीक्षणानुसार (BMC Survey), ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस (corona two vaccine) घेतले ते लवकर बरे झाले आहेत शिवाय, त्यांच्यात सौम्य संसर्ग आढळून आला आहे.
लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर किती जणांना संसर्ग झाला आहे? याची माहिती महानगरपालिका वाॅर्ड स्तरावर गोळा करुन अभ्यास करत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, गोळा करण्यात आलेल्या अहवालापैकी 9001 नागरिक दोन्ही डोस घेतल्यानंतरही संक्रमित झाले आहेत. तर, एकूण 23 हजारांहून अधिक नागरिक पहिला आणि दोन्ही डोस घेऊनही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर, पहिला आणि एक डोस घेतल्यानंतर तीन वयोगटातील 14,239 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 23000 लोकांना लस घेतल्यानंतर संसर्ग झाला आहे, यामध्ये पहिला डोस आणि दोन्ही डोस घेणाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांनी लसीचा फक्त एक डोस घेतला होता त्यांना जास्त त्रास झाल्याचे आढळून आले आहे. दुसरा वर्ग म्हणजे इतर आजारांशी लढणारे नागरिक. लस घेतल्यानंतर काही लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, परंतु हा आकडा खूपच कमी आहे. डेटा गोळा करण्याचे आणि विश्लेषणाचे काम सुरू आहे.
दोन्ही डोस घेतलेले
वयोगट नागरिक
18 ते 44 1,835
45 ते 59 2,687
60 वर्षांपर्यंत 4,479
एकूण 9001
पहिला डोस घेतलेले
18 ते 44 4,420
45 ते 59 4,815
60 वर्षांपर्यंत 5,004
एकूण 14, 239
18 ते 44 वयोगटातील 31 लाख 76 हजार 344 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे त्यापैकी 0.14 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत. तर, 45 ते 59 वयोगटातील 6 लाख 70 हजार 716 नागरिकांनी पहिला डोस घेतला त्यातील 0.72 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत, तर, 60 वर्षांखालील 3 लाख 28 हजार 680 नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून त्यातील 1.52 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत.
तर, दोन्ही डोस घेतलेल्या 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 93 हजार 686 नागरिकांपैकी 0.26 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले, त्यापाठोपाठ, 45 ते 59 वयोगटातील 10 लाख 88 हजार 244 नागरिकांनी दोन्हो डोस घेतला त्यातील 0.25 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत, तर, 60 वर्षांखालील 7 लाख 57 हजार 699 नागरिकांचा दोन्ही डोस पूर्ण झाला असून त्यातील 0.59 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत. याचा अर्थ दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे, नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.