अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन 

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन 

मुंबई - अकरावीत प्रवेश मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शाखा बदलण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. महाविद्यालयाने तयारी दाखवल्यास वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. समुपदेशनासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे. 

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या 11 फेऱ्या राबवल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत. वर्ष वाया जाऊ नये, यासाठी विद्यार्थी आणि पालक शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. त्यातच शाखा आणि बोर्ड बदलण्यासाठी 10 विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तीन-चार दिवसांत दूरध्वनी करून बोलावण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याबरोबरच शक्‍य झाल्यास अभ्यासाची शाखा किंवा बोर्ड बदलून देण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले. अद्याप प्रवेश न मिळालेले अनेक विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. लेखी अर्ज आल्यास त्यांचेही समुपदेशन करण्यात येईल. समुपदेशनानंतर महाविद्यालयाने प्रवेशाची तयारी दर्शवल्यास नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com