

Education Policy Sparks Concern as Marathi Schools in Mumbai Face Closure Crisis
sakal
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्याचा अभिमान बाळगणाऱ्या राज्याच्या राजधानीत मराठी शाळांवर संचमान्यतेच्या निकषांचे प्रचंड मोठे संकट आले आहे. यामुळे जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात कमी पटसंख्या झाल्याने तब्बल ५७ मराठी माध्यमांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे या शाळा सरकारनेच वाचविण्यासाठी आता पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.