मुंबई - दहीहंडी उत्सवातून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतील जास्तीत जास्त भाग गोविंदा पथकांकडून सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना देण्यात येईल, अशी माहिती दहीहंडी उत्सव समन्वय समितीने दिली.
राज्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवातील काही आयोजकांनी कार्यक्रम रद्द केले. हा निर्णय योग्य नसून उत्सव साजरा झाला पाहिजे, मात्र तो साधेपणाने साजरा करावा. आयोजकांनी बक्षिसांची रक्कम कमी केली तरी चालेल, अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीने घेतली आहे.
14 वर्षांखालील गोविंदा नकोत
प्रत्येक गोविंदा पथकांनी विमा कवच काढणे बंधनकारक आहे. गोविंदा पथकांनी विमा काढला आहे की नाही याची खातरजमा करूनच आयोजकांनी थर लावण्यास परवानगी द्यावी. 14 वर्षांखालील मुलांना थरावर परवानगी देऊ नये. त्यांचा अपघात झाल्यास मंडळ जबाबदार राहील, अशी स्पष्ट भूमिका दहीहंडी समन्वय समितीने घेतली आहे.
|